IPS Vishwas nangare patil full success story in marathi //// विश्वास नांगरे पाटील यशोगाथा मराठीमधून.
Table of Contents
विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड या छोट्याशा गावी झाला.त्यांचे वडील गावचे सरपंच व एक पैलवान होते.
विश्वास नांगरे लहान असताना त्यांच्या वडिलांची इच्छा होती कि विश्वास नि पैलवान व्हावं.विश्वास नांगरे पाटील शाळेत असताना खूप मजा -मस्ती करत असत.असेच एकदा ते शाळेत असताना ते शिक्षेकेच्या खुर्ची वर जाऊन बसले.त्याच्या शिक्षिकेने त्यांच्या कानशिलात मारली ,शिक्षिका त्यांना म्हणाल्या “विश्वास तू स्वतःला समजतोस काय ?पैलवाणाचा मुलगा ,सरपंचा मुलगा असाच गाव गुंड होशील किड्या मुंग्या सारखा जगशीन तुझी स्वतःची अशी काय ओळख राहणार ?
शिक्षिकेचे हे शब्द विश्वास पाटील यांना झोंबले त्यांनी ह्या गोष्टीचा विश्वास पाटील यांनी फार विचार केला.आणि ते त्यांच्या वडिलांना म्हणाले कि मला माझी वेगळी ओळख निर्माण करायची आहे।त्यावर त्यांचे वडील म्हणाले की शाळेत शिकूनच तुला तुझी ओळख निर्माण करता येईन। त्यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल बतीसशिराला येथे त्यांनी ऍडमिशन घेतले।
विश्वास नांगरेची हि नवीन शाळा १७ किलोमीटर लांब होती।जवळ पास एक तास जायला व एक तास यायला लागायचा हि गोष्ट त्यांचे गायकवाडे शिक्षक यांच्या लक्षात आले ते विश्वास नांगरे यांना स्वतःच्या घरी राहण्याच्या बदल बोले,त्यामुळे तुझी वेळेची बचत होईन.हि बाब विश्वास नांगरे यांना पटली आणि ते सरांच्या घरी राहायला गेले।
गायकवाड सर विश्वाससर यांना पहाटे ३वाजता अभ्यास करायला उठवायचे. सकाळी ३ वाजता थंड पाण्याचा नळा खाली बसून अंघोळ करून अभ्यासाला बसायचे.त्यामुळे १९८८ साली ८८% पडून विश्वास नांगरे तालुक्यात पहिले आले.त्यानंतर त्यांनी अकरावीला Science मधून कोल्हापूर येथे न्यू कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले.बारावीला असतांना त्यांच्या कॉलेज मध्ये भूषण गगराणी यांचे भाषण त्यांनी ऐकले।ते भारतात IAS मध्ये तिसरे आले होते, त्यामधून त्यांना कळले की मराठी साहित्य विषय घेऊन तसेच मराठीतून Upsc देऊ शकतो ,त्यावर त्यांनी विचार केला.पण बारावीचा Result लागल्यावर यावर विचार करू असे त्यांनी ठरवले.
बारावीला ९१% पडले,परंतु इलेक्ट्रॉनिक व मेकॅनिक ला goverment कॉलेज ला ऍडमिशन मिळत नव्हते.इतर अनेक सिविल ,इलेक्ट्रिकल ला ऍडमिशन मिळत होते.परंतु त्यांनी इंजिनेरिंग ,मेडिकल ला ऍडमिशन न घेता त्यांनी आर्टस् ला b.a ला ऍडमिशन घेतले.विश्वास नांगरे यांनी ठरवले की upsc मध्ये आपल्याला जायचे आहे.त्यामुळे पुस्तकांची व्यवस्था करणे एवढे सोपे नव्हते.त्यामुळे त्यांनी त्यांच्या गावात स्टडी सेन्टर उघडले,सहकारी संस्था तसेच त्यांचे तालुक्यातले आमदार यांनी त्यांना त्यासाठी आर्थिक मदत केली.त्या पुस्तकांच्या मदतीने त्यांना बऱ्याच गोष्टीची माहिती मिळाली.
विश्वास सरांचा B. A चा Result लागला त्यांना युनिव्हर्सिटी लेवल ला गोल्ड मेडल मिळाले.
Mpsc साठी त्यांनी फॉर्म या काळात त्यांनी भरला होता,आणि ते त्याची Prelium सुद्धा पास झाले होते.
सोशोलॉजि हा विषय त्यांनी घेतला होता,200 पैकी त्यांना त्यात 140 मार्क पडले होते। मुख्य परीक्षेचा Result लागला होता व त्यांना Interview चा देखील आला होता।परंतु Interview ला त्यांचे Selection झाले नाही.विश्वास तुम्ही सर्विस जॉईन करायला फार यंग आहात असे त्यांना सांगण्यात आले।तेव्हा त्यांचे वय २१होते. Interview नंतर त्यांना निराशा आली होती.१९९६ चा तो काळ विश्वास नांगरे त्यांच्यासाठी Badpatch असल्याचे सांगतात.त्यानंतरच्या काळात त्यांनी १९९७ त्यांनी त्यांच्या आतेभाऊ च्या फ्लॅटवर कल्याण ला सोय झाली.तेथे ते सकाळी साडेतीन ला उठून ट्रेन पकडत आणिV. T Station येथे लैब्रेरी मध्ये पोहचत असे। याकाळात त्यांनी सलग आठ महिने ते नऊ महिने त्यांनी अभ्यास केला।
यावर्षात त्यांनी MPSc तुन डेप्युटी कलेक्टर,सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर,Psi, या तिन्ही परीक्षा ते पास झाले।परंतु त्यांचे aim हे UPSC वर होते त्यांनी UpSc मधून Ias मधून पेपर दिले व ते त्यातून त्यांचे selection झाले.UPSC मध्ये बहुतांश त्यांचा interview हा मराठीत झाला,व थोडा फार हिंदी व इंग्लिश मध्ये झाला .या interview मध्ये त्यांना महाराष्ट्रातून सर्वात जास्त मार्क पडले होते। अशी होती विश्वास नांगरे पाटील यांची IPS होण्यापर्यंतची sucess story।।।।।।।
सद्दस्थितीत नाशिक पोलिस आयुक्त (२ मार्च २०१९ पासून)